Type Here to Get Search Results !

अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू; जाणून घ्या सविस्तर...!



औरंगाबाद : औरंगाबाद येथे सुरु असलेल्या अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करण नामदेव पवार (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. करण कन्नड तालुक्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद शहरात अग्निवीर सैन्य भरतीत १६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना एका तरुणाला अचानक चक्कर आली. त्यानंतर त्याचा  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी कन्नड तालुक्यातून करण औरंगाबाद शहरात आला होता. १६०० मीटरचा फेरा पूर्ण करत असताना चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यानंतर घाटी रग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.



दरम्यान, कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील करण पवार हा तरुण भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी औरंगाबादला आला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies