मुंबई: महाविकास आघाडी सरकाच्या काळात महाराष्ट्रात सीबीआयला घातलेली बंदी लवकरच उठवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे सरकारने राज्यात तपास करण्यासाठी सीबीआयला बंदी घातली होती. तीच बंदी उठवण्यासाठीच्या हालचाली एकनाथ शिंदे सरकारने सुरु केल्या आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत असताना सीबीआयला परवानगीशिवाय राज्यात तपासणीचे अधिकार नव्हते. परंतु आता सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून सीबीआयला तपासाचे अधिकार दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सीबीआयला राज्यात एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास कोणाच्या परवानगीची गरज भसणार नाही.