पटना : महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड्या पाहायला मिळत आहेत. नितीशकुमार यांनी भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दलासह इतर मित्रपक्षांबरोबर युती करून पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडून महागठबंधन केले.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच भाजपा आणि नितीश कुमार यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि भाजपा यांच्यात वाद सुरू होता. हा वाद काही दिवसांपासून शिगेला पोहचला होता. त्यामुळे, नितीश कुमारांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजद पक्षाला सोबत घेऊन महागठबंधन करण्याचा निर्णय घेतला. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार असून या आमदारांच्या पाठींब्याचे पत्र त्यांनी काल (९ ऑगस्ट) राज्यपालांकडे सोपवले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले होते.