मुंबई - आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आज शिंदे गटातील आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.यादरम्यान, विधान भवन परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व जनता पाहत आहे, १७ तारखेपासून अधिवेशन सुरू आहे. आजपर्यंत आम्ही पायऱ्यांवर विरोधात घोषणाबाजी केली. त्या घोषणा आज सत्ताधाऱ्यांन झोंबल्या आहेत. आमच्या मागणीकडे लक्ष न देता. ५० खोके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.