मुंबई: “बऱ्याच शिंदे समर्थक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. हिंदुत्वासाठी गेले तर त्यासाठी त्याग करायला हवा, वाईट वाटून घ्यायला नको. शिवाय बच्चू कडू यांची नाराजी स्वाभाविक आहे. तसेच बच्चू कडू ऐकणार नाहीत. मंत्री होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे गटातील नाराज आमदारांना टोला लगावला आहे.
दरम्यान, काल अनेक शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक आमदारांना डावलल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर हे नाराज आमदार आता 'मातोश्री'च्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.याच नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमिवर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता पाटील यांनी वरील वक्तव्य केले.