नवी दिल्ली: आपल्या गर्लफ्रेंडसाठी प्रियकराने आख्खी शाळाच पेटवून दिल्याची घटना घडली आहे. प्रियकराची गर्लफ्रेंड शाळेतील परिक्षेत नापास झाली. हे त्याला समजताच त्याने आख्खी शाळाच पेटवून दिली आहे. या प्रकरणी त्या सदर मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, तो प्रियकर आणि मुलगी गेल्या काही वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. तो मुलगा त्या मुलीवर खूप प्रेम करत होता. यादरम्यान त्या मुलीची परीक्षा सुरू होत्या. परीक्षेनंतर त्या मुलीची निकाल आला, तेव्हा ती मुलगी नापास झाली असल्याचे समोर आले. त्या मुलीने भितीने त्या मुलाला याची माहिती दिली नाही. यानंतर काही दिवसांनी त्या प्रियकराला या संदर्भात माहिती मिळाली. तेव्हा त्या मुलाला एवढा राग आला की, त्याने थेट शाळाचा पेटवून दिली.त्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने शाळेला आग लावली. त्याने शाळेतील कागदपत्रांना पहिल्यांदा आग लावली. तसेच या आगीत शाळेतील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली.
दरम्यान, मुलगी आणि मुलगा काही दिवसातच लग्न करणार होते, पण मुलगी नापास झाल्यामुळे लग्न पुन्हा एक वर्ष पुढे ढकलण्यात आले, या गोष्टीचा राग मनात धरुन त्या मुलाने थेट शाळाच पेटवून दिल्याचे तपासात पुढे आले आहे.तसेच, या आगीची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांना त्या प्रियकराला अटक केली.