Type Here to Get Search Results !

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य!



मुंबई:  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप जय्यत तयारी करताना दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 



भाजपने पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे. आशिष शेलार यांच्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'आशिष शेलार हे मुंबई अध्यक्ष याआधी देखील राहिले. त्यांच्या काळात पालिकेने गरुड भरारी घेतली. आम्ही त्यावेळी ८२ जागा जिंकलो. त्यावेळी महापौर आम्ही बसवला असता, पण आता ती कमतरता भरून काढण्यासाठी आता आशिष शेलार यांना आम्ही पाठवले आहे. मुंबई महापालिकेची लढाई ही महत्वाची आहे. आशिष शेलार हे शिलेदार आहेत. त्यामुळे केंद्राने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे'.



दरम्यान, वरील प्रतिक्रिया व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies