Type Here to Get Search Results !

मंत्रालयासमोरच शेतकऱ्याने स्वतःला घेतले पेटवून अन...!



मुंबई: आज, मंगळवारी एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोरच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी आग विझवली, या आगीमुळे हा शेतकरी गंभीररीत्या भाजला गेला आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, हा शेतकरी सातारा येथील असून त्याचे नाव सुभाष भानूदास देशमुख, वय - ४५ असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. यावेळी शेती विषयक प्रश्नांच्या मागण्यासाठी आत्मदहन करण्यासाठी ते आले होते. पोलिसांनी त्यांना आत्मदहनापासून परावृत्त केले आणि त्यांच्या ताब्यात असलेले ज्वलनशील पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



दरम्यान, या जखमी शेतकऱ्याला जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies