रायगड: शिवसनेने बंडखोर ४० आमदारांविरोधात सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर गेल्या दोन महिन्यापासून सुनावणी सुरू आहे. मागील काही दिवसापूर्वी सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने हे प्रकरण घटना पीठाकडे दिली आहे. आत या पुढील सुनावणी घटनापीठ घेणार आहे. यावर आता शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
शिवसेनेने केलेल्या याचिकांची सुनावणी आता घटनापीठ घेणार आहे. त्यामुळे हा निकाल येण्यासाठी अजून ४ ते ५ वर्ष लागू शकतात. तोपर्यंत पुढची निवडणूक येईल, असे वक्तव्य शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी केले आहे.