पंढरपूर: निलम गोऱ्हे या पंढपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता त्यांनी भाजपच्या 105 आमदार अन् खासदारांनी राजीनामा द्यावा हि मागणी केली.
यावेळी त्या म्हणाल्या, “भाजपच्या 105 आमदारांनी कधी कार्य अहवाल सादर केला का? हे काही कामच करत नाहीत. केंद्र सरकारने खासदारांचा निधी स्वतःकडे वळवला. जनतेला काहीच कळू देत नाहीत. भाजपचे दाबवाचे राजकारण सुरू आहे. पंढरपूरचा प्रास्तविक विकास आराखडा जनतेला माहिती नाही. त्यामुळे स्थानिक भयभीत आहेत. पंढरपूर विकास आराखड्या मागे सूत्रधार कोण? हे पुढे आले पाहिजे, असं सांगतानाच आम्ही भाजपचे वेठबिगारी नाहीत. आमच्या मतावर भाजपचे 105 आमदार आणि खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा राजीनामा द्या, असे मागणी करणारे वक्तव्य निलम गोऱ्हे यांनी केले आहे.