बीड : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार नव्याने स्थापन झाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार हे जास्त काळ टीकणारे सरकार नाही. हे सरकार लवकरच कोसळेल. शिंदे गटाच्या ४० आमदारांवर सध्या टांगती तलवार असून ते कोर्टाच्या वाऱ्या करत आहेत. या चाळीस आमदारांना मंत्रिपद पाहिजे, म्हणून हे सरकार अस्थिर सरकार आहे, असे वक्तव्य पाटील यांनी केले.
दरम्यान, बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.