मुंबई: सप्टेंबर महिना हा भारताच्या तसेच जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आज 16 सप्टेंबर रोजी जगभरात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचा इतिहास आहे. आजच्याच दिवशी मेक्सिकोने स्वत:ला स्पेनच्या गुलामीतून मुक्त झाल्याचं जाहीर केलं. तर भारत आणि भूटानच्या मैत्री संबंधासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून भारत विरोधी कोणत्याही कृत्यासाठी आपली भूमी वापरू देणार नाही असे आश्वासन भूटानने दिले होते. याव्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेऊयात .
1810- मेक्सिकोने स्वातंत्र्य असल्याचे जाहीर केले
1920- अमेरिकेच्या वॉल स्ट्रिटवर बॉम्ब स्फोट, 38 जणांचा मृत्यू
1931- ब्रिटनमध्ये महामंदी
1978- इराणमध्ये भूकंप, 20 हजार लोकांचा मृत्यू
.
1978- पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी जनरल जिया उल हक यांची निवड
2003- भूटानचे भारताला आश्वासन
भारत विरोधात कोणत्याही कृत्यासाठी भूटानच्या भूमीचा वापर होऊ देणार नाही असं आश्वासन भूटानने भारताला दिलं. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भूटानने हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.