रत्नागिरी : राज्यात शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर बंडखोर नेत्यांनी थेट पक्षप्रमुख यांच्यावरच निशाणा साधण्यास सुरवात केली होती. अशातच आता रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
रामदास कदम म्हणाले, “केवळ स्वार्थासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. बाळासाहेबांनी हे करायला परवानगी दिली असती का? असा प्रश्न शेंबड्या मुलाला जरी विचारला असता तरी उत्तर हे नाही हेच असते असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रिमंडळात आले होते. त्यांच्या अशा कर्तृत्वामुळेच वेदांता हा प्रकल्प गुजरातला गेला. आता या प्रकल्पावरुन राज्य सरकार टीका करणे म्हणजे चुकीचे आहे. सर्वकाही महाविकास आघाडीच्या काळात घडले आणि आता आरोप हे शिंदे सरकारवर केले जात आहेत.