Type Here to Get Search Results !

‘या’ निर्णयामुळे टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना मोठा दिलासा!



औरंगाबाद: टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचे पगार थांबवू नका. त्यांचं वेतनवाढ थांबवू शकता, पण पगार नाही. असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने शिक्षण विभागाला दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळे टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 



दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने टीईटी घोटाळ्यासंबंधी ७ हजार ८८० शिक्षकांवर कारवाई केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविले होते. याप्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.यावर निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठाने वरील निर्देश शिक्षण विभागाला दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies