मुंबईः “पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या वर्तणुकीला, स्वभावाला ठेचून काढलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. या सगळ्यांना चुन चुन को पकड लो आणि एक एक करून ठेचून काढलं पाहिजे, अशी आमची मागणी गृहमंत्र्यांकडे आहे. तेदेखील हेच करतील, असा आमचा विश्वास आहे”, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे.
दरम्यान, पुण्यात पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्या प्रकरणी आज आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.