Type Here to Get Search Results !

“बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची.....” ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई: भाजपकडून सातत्याने बारामती आणि पवार कुटुंबावर निशाणा साधला जात आहे. अशातच  आता पवार फॅमिलीचे सदस्य आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपला टोमणेवजा सल्ला दिला आहे. 



रोहित पवार म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी बारामतीत आलंच पाहिजे. तेथे झालेला विकास त्यांनी समजून घेतला पाहिजे. तसेच बारामतीत जो विकास झालाय त्या मुद्द्यावरूनच राजकारण करायला हवं. मी गणपती बाप्पांकडे सत्तेची प्रार्थना केली नाही. मात्र, राजकारणाची पातळी खाली जात आहे. त्याऐवजी लोकांच्या विकासावर राजकारण व्हावं आणि सुडाचं राजकारण थांबावं. भावनिक विषयांवर राजकारण न होता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हावं, अशी प्रार्थना मी गणपतीरायांना केली, असेही रोहित पवार यांनी वक्तव्य केले.


ते पुढे म्हणाले की,  आज बारामती पवारमुक्त करायची, मुंबई ठाकरेमुक्त करायची या दोन विषयांवर भाजपाचं राजकारण केंद्रीत आहे. मात्र, सामान्यांच्या रोजगाराचे प्रश्न, बेरोजगारी कमी करणं, शेतकऱ्यांचे विषय, शहरी-ग्रामीण विषय यावर भाजपाचे नेते बोलत नाहीत, असं त्यांनी म्हटलं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies