अकोला: राज्यातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी सुरु आहे. याच सुनावणी दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे.
पटोले पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारच मुळात असंवैधानिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील सदस्यत्व अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना त्यांचे मुख्यमंत्री म्हणून निर्णय वैध कसे, तसेच, न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळले तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकतं अशी शक्यता पटोले यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ते अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये बोलत होते.