मुंबई: आज उच्च न्यायलयाने उद्धव ठाकरे यांना दिलासा देत दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबत परवानगी दिली. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटावर जोरदार टीका केली.
'न्यायलायचा निकाल हा दिल्लीचे खोके घेऊन काही बोके हा दसरा मेळावा होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. त्या बोक्यांना आता न्यायदेवतेने चपराक लावली आहे. सत्तासंघर्षावर असाच निर्णय सुप्रीम कोर्टाने देत खोके घेणाऱ्या बोक्याच्या हैदोसातून महाराष्ट्राची मुक्तता करावी, अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली.
दरम्यान, मेहबूब शेख हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.त्यावेळी ते बोलत होते.