Type Here to Get Search Results !

“....तर उद्धव ठाकरे यांनी मला फोन करावा”: केंद्रीय मंत्री नारायण राणे!



मुंबई:  उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 



त्यावेळी नारायण राणे म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्याकडे चांगली वाक्य नसतील, तर त्यांनी मला फोन करावा, त्यांना चांगलं बोलताच येत नाही. माझ्याकडे चांगली वाक्य आहेत. चांगल्या गोष्टींचं कौतुक करावे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.



दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतात नामिुबियावरून चित्ते आणण्यात आले. हेच चित्ते भारतात आणण्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचा उल्लेख 'चित्ता सरकार' करत टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या याच टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies