जळगावः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्ये आज मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची जंगी सभा होत आहे. यानिमित्त जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठी तयारी केली आहे. सभेपूर्वी प्रसारमाध्यामाशी बोलताना प्रतिक्रियेत पाटील यांनी शिवसेना आणि खडसेंवर टीकास्र सोडले.
आमदार गुलाबराव पाटील म्हणाले, “आदित्य ठाकरे यांचे नाव फक्त ठाकरे असल्यामुळे त्यांना महत्त्व आहे. त्यांना आमदार करण्यासाठी दोन आमदार द्यावे लागले, तसेच आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार आहेत. विचारांचे वारसदार आम्ही आहोत, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.