मुंबई: ‘वेदांता’ प्रकल्प हा गुजरातला गेला यावरून आतापर्यंत वेदांता प्रकल्पावरुन अनेकांनी आप आपले मत मांडले आहे. पण शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी याबाबत काय झाले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
फडणवीस म्हणाले, सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती. त्यामुळे आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. तसेच, महाराष्ट्राला डावलून हा प्रोजेक्ट गुजरातला का असा सवालही राज्य सरकारने उपस्थित केला होता. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रव्यवहारही केला होता. पण अनिल अग्रवाल यांनी याकरिता आता उशिर झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, वेदांता शिवाय इतर प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी अग्रवाल हे इच्छूक असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.