रत्नागिरी - भारतीय जनता पार्टीने राज्यात वेगवेगळे विषय उभे करून दंगल घडवण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. कधी कंगना रणौत, सुशांत सिंग राजपूत तर कधी नुपूर शर्मा, काही जणांच्या हाती भोंगा दिला आणि एकाकडे हनुमान चालीसा दिली. नानातऱ्हेने महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे मुख्यमंत्री सर्वजाती धर्माचे लाडके होतायेत त्यासाठी भाजपा अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत होती असा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जाधवांनी भाजपावर हल्लाबोल केला.