नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी आयकरने छापे टाकले आहेत. या कारवाईत निमलष्करी दलाचीही मदत घेण्यात येत आहे. राजकीय पक्षांच्या नावाने देणगी गोळा केल्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. ही फसवणूक करणाऱ्यांवर आयकर विभाग कारवाई करत आहे. विभागाने उत्तर प्रदेशातील सुमारे २४ ठिकाणी छापे टाकले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि गुजरात या राज्यात आयकर जास्त कारवाई करत आहे. यात काही राजकीय नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या राजकीय पक्षांनी लोकांकडून देणगी घेतली असल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाची ही कारवाई निवडणूक आयोगाच्या अहवालावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. तर यासोबतच काही कॉर्पोरेट्सही आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. जयपूरमध्येही छापे टाकले जात आहेत.