मुंबई: राज्यात 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 12 दिवसात सरासरी 7 दिवस पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पणे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. तसेच, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
दरम्यान, एनडीआरच्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेला आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.