मुंबई: उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळालेल्या नवीन चिन्हावर सुद्धा आता समता पार्टीने दावा केला आहे. मशाल चिन्ह आमचं आहे असा दावा समता पार्टीच्या नेत्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात वाद वाढण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह आपलं असल्याचा दावा समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचं सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
दरम्यान, यावर आज निर्णय अपेक्षित असून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याची घोषणाही समता पार्टीने केली आहे.