मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, मुंबई महापालिकेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसं पत्र सुद्धा लटके यांना महापालिकेकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे पत्र त्यांना दिले आहे. हे पत्र घेण्यासाठी ऋतुजा लटके या स्वत: महापालिकेत आल्या होत्या. आता त्या पत्र घेऊन दुपारी निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत.