मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास ४ महिन्यांचा कालावधी उलटला, तरी देखील मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा अजूनही पार पडलेला नाही. अशातच अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीपदावरून एक मोठे विधान केले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता, 'मी काय प्रमुख आहे का? शिंदे गट आणि भाजपमध्ये आमचा प्रहार पक्ष लहानसा पक्ष आहे त्यामुळे मी आता मंत्री होईल नाही तर अडीच वर्षानंतर मला मंत्रीपद मिळेल’, असे उत्तर बच्चू कडू यांनी दिले.
दरम्यान, आमदार बच्चू कडू हे आज अमरावती येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. तसेच, बच्चू कडू यांच्या या विधानानंतर ते पुन्हा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.