आटपाडी/प्रतिनिधी : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची' हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आटपाडी तालुक्यात १५ जुन पर्यंत हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती तहसीलदार बी.एस.माने यांनी दिली.
या अभिनातंर्गत नागरिकाना शासकीय योजनांशी निगडीत सर्व कार्यालयांचे प्रतिनिधी आणि विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली येवुन लाभ देणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत विविध विभागाच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, अर्ज भरून घेण्याचे काम केले जात असल्याचे तहसीदार माने यांनी सांगितले.
कमी कालावधीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहचविण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यामुळे या अभियानाचा लाभ आटपाडी शेतकरी, जनतेने घ्यावा. हे अभियान यशस्वी करून आपल्या प्रश्नांची सोडवणुक करून घ्यावी. त्याबाबतच्या माहितीसाठी जनकल्याण कक्ष किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही तहसीलदार बी.एस. माने यांनी केले आहे.