माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील राजेश जाधव यांची “बा रायगड” परिवार संस्थेच्या सांगली प्रमुखपदी निवड झाली. सदरची ही संस्थेचे अध्यक्ष चैतन्य भालेराव यांनी केली.
“बा रायगड” परिवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुर्ग संवर्धन, सह्याद्री भटकंती, सामाजिक कार्य केले जाते. छत्रपती शिवराय व सह्याद्री या महाराष्ट्र भूमीतील माणसाच्या जिव्हाळ्याच्या व आत्मियतेच्या गोष्टी ह्याच सह्याद्रीतील महाराजांचे गडदुर्ग सर्वांना अनुभवता यावेत, त्या गडदुर्गांच्या वाटेवर कित्येकांना आणावे अन यातुन दुर्ग संवर्धन चळवळ उभी राहावी यासाठीचा हा सर्व अट्टाहास परिवाराने आतापर्यंत नेटाने उभा केला आहे.
परिवाराच्या वतीने राज्यातील विविध १८ किल्यावर संवर्धन कार्य चालू आहे. सामाजिक काम म्हणून रक्तदान शिबीर, दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे सॅनेटरी पॅडचे वाटप करण्यात येते. त्याच बरोबर पुर कालावधीमध्ये पूरग्रस्तांना मदत यासारखी सामाजिक कार्य संस्थेच्या वतीने केली जात असून कोणत्याही मानधना विना दुर्ग सेवक स्वच्छेने या कार्यात सहभाग घेतात.
दुर्ग संवर्धन, सह्याद्री भटकंती व सामाजिक कार्याचा हा वटवृक्ष अजूनच आपली विस्ताराच्या शाखा पसरवतोय यातूनच सांगली जिल्हा जिल्हा विभाग प्रमुखपदी राजेध जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचा समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.