माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले का? असा खोचक सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत काही प्रकल्पांचं लोकार्पण आणि काही प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात आले. मात्र यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र या दौऱ्यावर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ग्रामपंचायत सरपंच झाले म्हटल्यानंतर काय बोलणार? एखाद्या गावात कुठेही काहीही झालं तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे. म्हणूनच मी म्हणतोय की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून आता सरपंच झाले आहेत, अशा शब्दात बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
भाजपा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेतो. मात्र त्यांच्याच कार्यकाळात मागील एक वर्षात जवळपास १ लाख १३ हजार हिंदूंनी देश सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. त्यातील एकाने आपलं मनोगत व्यक्त करत भाजपा आम्हाला आमच्या विचाराने चालू देत नसल्याचं आणि भाजपा आम्हाला त्रास देत असल्याचं म्हटलं आहे.
आमच्या वाड-वडिलांनी जी अब्रू कमावली ती भाजापाकडून धुळीस मिळवली जाते आहे म्हणून आम्ही देश सोडत आहोत असं म्हटलं आहे. मुस्लिम किंवा ख्रिश्चन बांधवांनी देश सोडला असता तर एकवेळ मी समजू शकतो. मात्र भाजपाच्या राज्यात हिंदू देश सोडून जात आहेत अशीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा