गेल्या काही दिवसापासून कॅनडा आणि भारत या दोन देशाचे संबंध बिघडले आहेत.
यांनी भारतावर - खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येत भारत सरकारचा संबंध असल्याचा आरोप केला आहे.
यावरुन आरोप-प्रत्यारोपही झाले. दरम्यान, भारताशी बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे प्रमुख आणि विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांनी मोठे विधान केले आहे.
पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा निषेध केला असून ते कॅनडाचे पंतप्रधान झाल्यास भारतासोबतचे संबंध पूर्ववत करतील, असं ते म्हणाले. “आम्हाला भारत सरकारसोबत व्यावसायिक संबंध हवे आहेत.
भारत ही पृथ्वीवरील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपले मतभेद असणे आणि एकमेकांना जबाबदार धरणे ठीक आहे, पण आपल्याला व्यावसायिक संबंध ठेवायला हवे. मी या देशाचा पंतप्रधान झाल्यावर ते पुनर्संचयित करेन, असं पियरे पॉइलीव्हरे म्हणाले.