माणदेश एक्सप्रेस न्यूज
विटा : खानापूर तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या गटाला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त गटाला दोन ग्रामपंचायत मिळाले. राजधानी भेंडवडीत शिवसेना आमदार बाबर गटाला धक्का बसला असून येथे विरोधी गटाने सत्तांतर घडवून आणले आहेत.
खानापूर तालुक्यातील साळशिंगे, राजधानी भेंडवडे, देवनगर व गावठाण भेंडवडे या चार ग्रामपंचायतीसाठी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह गायकवाड यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.
या निवडणुकीत विद्यमान आ. अनिल बाबर गटाला देवनगर व गावठाण भेंडवडे येथे सत्ता मिळाली असून गावठाण भेंडवडे येथे राष्ट्रवादीचे युवा नेते राजू जानकर यांना धक्का देत विद्यमान आमदार बाबर गटाने सत्ता काबीज केली आहे.
तसेच माजी आमदार सदाशिवराव पाटील व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त गटाने राजधानी भेंडवडे येथे सत्तांतर घडवून आणले असून आ. बाबर यांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. याच गटाने साळशिंगे ग्रामपंचायतीची सत्ता कायम ठेवली आहे.