माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत असल्यामुळे संजयकाका पाटील यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी केले. झरे येथे भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांचा प्रचारार्थ सभा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी आमदार असताना टेंभू योजनेला सुरुवात झाली. यावेळी शिवसेना भाजप युतीचे सरकार होते. यावेळी पाच वर्षात योजनेचे मोठ्या प्रमाणत काम झाले. परंतु युती सरकार गेल्यावर राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आले. यावेळी टेंभू योजनेला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नाही. अनुशेषाच्या नावाखाली निधी नाकारण्यात आला.
परंतु याचे उलटे चित्र म्हणजे, कॉंग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या मतदार संघामध्ये मात्र मोठ्या प्रमाणत निधी खर्च केला जात होता, हे मी जवळून पहिले आहे. आता मुळातच टेंभू योजनेला जे पाणी आले आहे ते भाजपने आणले असून आटपाडी तालुक्यातून संजयकाका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितीतांना केले.
यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, उमेदवार संजयकाका पाटील, आम. गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.