माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ही संपूर्ण राज्यात १० जागा लढवत असून पुढील निवडणुकीत त्यांची पार्टी दिसणार नसल्याची जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली. झरे येथे भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने आटपाडीच्या टेंभू योजनेला निधी मागितली असता निधी देण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारित टेंभू योजनेला 7000 कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकही गाव शेतीच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना वन साईड मतदान झाले पाहिजे.
तसेच माझे अने संजयकाका यांच्या इतका संघर्ष कोणाचा जिल्ह्यात झाला नाही. हे सगळे असले तरी, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. येथुन पुढे कोणीही काहीही सांगेल त्याकडे लक्ष देवू नका. संजयकाका दोन लाख मतांनी निवडून येतील. तसेच निवडून आल्यावर काकांनी खानापूर मतदार संघासाठी ऑयडल कामे करावी असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
यावेळी मंचावर पालकमंत्री सुरेश खाडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी सभापती ब्रम्हदेव पडळकर, हर्षवर्धन देशमुख, भाजप जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह हरीशेठ पाटील, जयवंत सरगर. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.