'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचं करिअर एका नव्या उंचीवर पोहोचवलं. या चित्रपटात ऐश्वर्या रा, सलमान खान आणी अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण या चित्रपटात ऐश्वर्याच्या आधी दुसऱ्या एका अभिनेत्रीची निवड करण्यात येणार होती , हे तुम्हाला माहीत आहे का ?
मनिषा होती निर्मात्यांची निवड. हो,हे खरं आहे. ‘हम दिल दे चुके सनम’मधील ‘नंदिनी’च्या भूमिकेसाठी अभिनेत्री मनिषा कोईराला हिला अप्रोच करण्यात आलं होतं. 28 वर्षांपूर्वी मनीषा कोईराला हिने संजय लीली भन्साळीसोबत खामोशी चित्रपटात काम केलं होतं. त्यामध्ये सलमान खान याचीही प्रमुख भूमिका होती. आता मनिषा ‘हीरामंडी’द्वारे पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करत आहे. याचदरम्यान एका मुलाखतीमध्ये मनिषाने हम दिल दे चुके सनम बद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
मनिषा म्हणाली – ‘ खामोशी’ या चित्रपटानंतर माझं आणि संजय यांचं बाँडिंग चांगलं खूप चांगलं होतं, ते आत्तापर्यंत तसंच कायम आहे. त्यामुळे जेव्हा ते हम दिल दे चुके सनम दिग्दर्शित करणार होते, तेव्हा आमचं बोलणं झालं. मी तेव्हा नेपाळमध्ये आनंदात आयुष्य जगत होते आणि तेव्हाच मला या चित्रपटाची ऑफर मिळाली. पण दुर्दैवाने मी या चित्रपटाचा एक भाग बनू शकले नाही. एवढंच नव्हे तर शाहरुखची भूमिका असलेल्या देवदास चित्रपटातील भूमिकेसाठीही मला विचारणा करण्यात आली होती’ असं मनिषाने नमूद केलं.
हीरामंडी या वेब सीरिजमधून मनिषा कोईराला बऱ्याच काळानंतर संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यास सज्ज झाली आहे. यामध्ये मनिषाची अत्यंत प्रमुख आणि दमदार भूमिका आहे. ओटीटीवर ही वेबसीरिज नुकतीच रीलिज झाली.