रविवार म्हणजे सुट्टीचा वार. शाळेत जाणारी लहान मूलचं नव्हे तर नोकरी करणारी मोठी माणसाही या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा वार.
रविवारी शाळा, कॉलेज आणि बहुतेक कंपन्या, ऑफिस बंद असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतात असं एक ठिकाण आहे, जिथं फक्त माणसंच नव्हे तर प्राण्यांनाही रविवारी सुट्टी दिली जाते.
झारखंडच्या लातेहार गावात ही परंपरा सुरू झाली. त्यानंतर जवळच्या हर्खा, मुंगर, लालगडी आणि पक्रर गावातही तसंच केलं जातं.
गाय, म्हैस, बैल असे प्राणी माणसांना त्यांच्या कामात मदत करतात, उत्पन्न मिळवून देतात. कित्येकांच्या उत्पन्नांचं साधनच हे प्राणी आहेत. त्यामुळे असं ठिकाण जिथं या प्राण्यांना रविवारी आराम दिला जातो. त्यांच्याकडून कोणतंच काम करवून घेतलं जात नाही.
यामागे खरंतर एक कारण आहे. दहा दशकांपूर्वी शेतात काम करताना एका बैलाचा मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थांनी प्राण्यांनाही आठवड्यातून एकदा विश्रांती देण्याचं ठरवलं. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा पाळली जाते.