मुंबई : ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे, फडणवीस सरकारने महापालिका आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “लटके यांच्या राजीनाम्याबाबत महापालिका आयुक्तांवर कुठलाही दबाव नाही. याबाबत महापालिका आयुक्तांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे. त्यांनी आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचं म्हटलं आहे. राजीनाम्याची जी तीस दिवसांची प्रक्रिया असते ती प्रक्रिया आयुक्त सध्या फॉलो करत असल्याचे म्हणत चित्रा वाघ यांनी हे आरोप फोटाळून लावले आहेत.