माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथील दिनांक ०६ पासून बेपत्ता असलेल्या सुनंदा चांडवले (वय ४५ वर्ष) या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे निष्पण झाले असून त्यांना विहिरीमध्ये आज मृतदेह सापडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तळेवाडी येथील सुनंदा चांडवले ही महिला दिनांक ०६ सोमवार सायंकाळी ५.०० वाजलेपासून बेपत्ता झाली होती. याबाबत सदर महिलेचा शोध घेणे सुरु होते. याबाबत आटपाडी पोलीस ठाणे येथे मिसिंग केस ही महिलेच्या नातेवाईकांनी नोंद केली होती.
परंतु आज दिनांक ०९ रोजी सकाळच्या सुमारास तळेवाडी गावाशेजारीच असणाऱ्या विहिरीमध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. याबाबत खात्री केली असता सदर मृतदेह हा सुनंदा चांडवले यांचा असल्याचे निष्पण झाले आहे.