देशातील लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला आहे. या मतदार संघामध्ये आता मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. पण काही जणांना त्यांचे मतदान कार्ड, ओळखपत्रच सापडत नाहीत. त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. कारण त्यांना वोटर आयडी, मतदान कार्ड नसलं तरी मतदान करता येणार आहे. पण त्यासाठी ही कागदपत्रं जवळ बाळगणे आवश्यक आहे. कोणती आहेत ही कागदपत्रं? जाणून घेऊया..
देशामध्ये मध्ये पहिल्या टप्प्यात देशातील 102 मतदारासंघात मतदान होणार आहे. त्यासाठी सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन पण करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात मतदान होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी अर्थात तुमच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर गेल्यावर तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड मागितले जाते. निवडणूक आयोग मतदान कार्ड देते. त्यासाठी विहित प्रक्रिया आहे.
जर तुमचे मतदान कार्ड हरवलं असेल तर तुम्हाला मतदान करता येतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतो. त्याविषयी निवडणूक आयोगाने खास सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल, हरवलं असल्यास तुम्हाला मतदान करता येते. तुम्हाला मतदानाचा अधिकार बजावता येतो. त्यासाठी काही कागदपत्रे मात्र, मतदान करतेवेळी सोबत बाळगणे आवश्यक आहेत.
ही कागदपत्रं आहेत गरजेची
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- छायाचित्रासह बँक अथवा पोस्टाचे पासबुक
- मनरेगाचे जॉब कार्ड
- आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
- चालक परवाना
- फोटोसह पेन्शन दस्तावेज
- ग्राह्य धरण्यात येणारे इतर सरकारी योजनांचे ओळखपत्र