राणेंच्या नकलीपणाच्या आरोपावर रोहित पवार म्हणाले...
अहमदनगर : कृषी कायद्यांविषयीची भूमिका दुटप्पी आणि नकलीपणाची असल्याचा आरोप भाजप नेते निलेश यांनी रोहित पवार यांच्यावर केला होता. त्यांच्या या आरोपाला रोहित पवार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. निलेश राणे यांनी ते ट्विट घाईघाईत केले असावे.
मी अभ्यास करुनच बोलतो. कोणत्याही बातमीवरुन निष्कर्ष काढताना त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. मात्र, निलेश राणे यांनी केवळ बातमीच्याआधारे ट्विट केले, असे रोहित पवार यांनी म्हटले.
कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा असलेला विरोध आणि या पार्श्वभूमीवर होत असलेले शेतकरी आंदोलन हा खूप महत्वपूर्ण विषय आहे. यासंदर्भात, मी ४ डिसेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पोस्टचा आधार घेऊन काही न्यूज पोर्टलने मी दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केलाय.https://t.co/0vm0wsWZro pic.twitter.com/Nk7aJrL1YU
तेअहमदनगरमध्ये बोलत होते. मी शेती विषयात अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल माझी भूमिका मी सविस्तर मांडत असतो. शेतकरी हिताच्या गोष्टी मी करतो, त्याविषयी लपवालपवी करत नाही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग योग्य पद्धतीने केले तर शेतकऱ्याचा फायदा होतो. मात्र केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात जाचक अटी असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.