मुंबई : राज्यात मान्सून जोरदार सक्रीय झाला असून मुंबईला शहर व उपनगर यांना सकाळपासून पावसाचा जोरदार तडाखा बसला असून सायन-कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल बंद करण्यात आली आहे.
#WATCH | Maharashtra: Severe waterlogging at Kings Circle in Mumbai, due to heavy rainfall. #Monsoon has arrived in Mumbai today. pic.twitter.com/PI2ySwhBCR
— ANI (@ANI) June 9, 2021
पहाटेपासूनच संततधार सुरु असून कुर्ला आणि सायन येथे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हार्बर, ट्रान्स हाबर आणि पश्चिम रेल्वे वाहतूक सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
मुंबईच्या अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईकरांची पहिल्याच पावसात कसरत करावी लागत आहे. पहिल्याच पावसात मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल धिम्या गतीनं सुरू तर संततधार पावसाचा वाहतुकीलाही फटका बसला आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस