आटपाडी : आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील दोन सख्या भावांचा सह चुलत भावांचा अशा तिघा भावंडांचा जांभूळणी येथील ओढ्यावरती असणाऱ्या बंधाऱ्यात वाहुन गेल्याची दुर्देवी घटना घडली असून याठिकाणी शोधकार्य चालू आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, घाणंद येथील विजय अंकुश होनमाने (व.व.१५) व आनंद अंकुश होनमाने (व.व. १६) तसेच त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू होनमाने (व.व. १७)हे सायंकाळच्या सुमारास जांभूळणी हद्दीतील असणाऱ्या बंधाऱ्यावरती मासे पकडण्यासाठी गेले असल्याची चर्चा आहे. सध्या टेंभू उपसा योजनेचे पाणी सुरु असल्याचे बंधारा फुल्ल भरून वाहत आहे. याठिकाणी आटपाडी चे तहसीलदार, पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी थांबून आहेत.
घटना घडलेल्या ठिकाणी शोध कार्य स्थानिक पातळीवर सुरु आहे. परंतु पाण्याची खोली मोठी असून बंधाऱ्याच्या आतमध्ये ठिकाणी-ठिकाणी चिलारीच्या झाडीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचबरोबर पाण्याचा प्रवाह देखील मोठा आहे. त्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. सध्या टेंभू योजनेचा पाणी बंद करण्यात आले आहे. याठिकाणी भिलवडीहून रेस्क्यू टीम बोलविण्यात आली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस