अखेच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर मात केली. भारतासाठी अस्तित्वाची लढाई असणार्या या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेटचे प्रदर्शन केले. मात्र अखेर भारतीय खेळाडूंचे उपांत्य फेरीत धडक मारण्याचे स्वप्न भंगले.
शेवटच्या पाच षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेला ४५ धावांची गरज होती. भारताची सामन्यावर पकड मजबूत दिसत होती. मात्र पूजा वस्त्रकरच्या षटकात मिनॉन डुप्रीलाने सलग दोन चौकर लगावले. यानंतर राजेश्वर गायकवाडच्या षटकात तीन चौकार फटकावल्याने भारतीय संघ बॅकफूटवर गेला. राजेश्वरीने ट्रेयानला झेलबाद केले. मात्र तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली होती. धावांचा पाठलाग करताना एका बाजूला विकेट गमावत असताना मिग्नोन डू प्रीज दमदार खेळाचे प्रदर्शन घडवले. तिच्या अर्धशतकीमुळे दक्षिण आफ्रिका संघाचा मार्ग सुकर झाला.
अखेरच्या षटकात तीन चेंडूत चार धावांची गरज होती. यावेळी दीप्तीने मिनॉन डुप्रीला हरमीनप्रीत कौरकडे झेल देणे भाग पाडले; पण हा नोबॉल ठरला आणि भारताचा विकेट घेतल्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. यानंतर दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी दोन चेंडूवर केवळ दोन धावांची गरज होती. नोबॉलमुळे फ्री हिट मिळाली. या चेंडूवर एक धाव काढण्यात आली. यानंतर अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत दक्षिण आफ्रिकेने तीन गडी राखत सामना आपल्या खिशात घातला.