जालना - जमिनीच्या वादातून विधवा वाहिनी, पुतण्या आणि पत्नीला घरासह पेटून दिल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील कोनड बुद्रुक गावात रविवारी मध्य रात्री तीनच्या सुमारास घडल्याचे समोर आले . जखमी महिला व तिच्या दोन मुलांनवर बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, जाफराबाद तालुक्यातील कोनड गावातील मगलाबाई परिहार या महिलेच्या पतीचा मृत्यू पाच महिन्यापूवी झाल्याने ही महिला ज्ञानेश्वरी परिहार मुलगा व एक लहान मुलगी शेतात राहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचा दीर जमिनीच्या वाटणी वरून कायम वाद घालत होता. चार दिवसापूर्वी मंगलबाई पेरणी करत असताना दिर समाधान रामसिंग परिहार यांनी जीवेमारण्याची धमकी दिली होती.
रविवारी रात्री तीनच्या सुमारास मंगलबाई आपल्या मुलासह घरात झोपली असताना घरात धूर निघत असल्याचे मुलीला लक्षात आले. त्यानंतर तिने भाऊ आणि आईला उठवले तेव्हा घराला आग लागली असल्याचे लक्षात आले. मंगलबाई यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयन्त केला मात्र दरवाजाची कडी बाहेरून लावली असल्याने त्यांनी खुर्ची घेऊन बाहेर हात घालून कडी उघडून बाहेर पळ काढला.
तेव्हा बाहेर फवारणी पपं पाठीवर घेऊन उभ्या अडलेल्या दिराने फवारणी पंप मुलासह वाहिनीच्या अंगावर मारून हातात असलेल्या टेभा अंगावर फेकून आग लावली यात मंगलबाई मुलगा आणि मुलगी गंभीर भाजल्याने त्यांना ग्रामस्थांनी त्यांना चिखली येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपी समाधान रामसिंग परिहार यांच्या विरुद्ध ३०७,५३६, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.