मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले.
औरंगाबादसह उस्मानाबाद शहराचं नामांतर करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द केला होता. मात्र, 16 जुलै रोजी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शहराच्या नामांतराचा निर्णय पुन्हा घेण्यात आला.
त्यानुसार औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव असं करण्यात आले. याशिवाय नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.