नागपूर :, 'ज्या नेत्याने बळ दिले, ज्याने घडविले, संधी दिली, त्याचे इमान राखू शकले नाहीत, त्या नेत्याला अशा पद्धतीने सोडून जाणे दुर्दैवी असून शिंदे गटाचा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर होता तर मग ते अडीच वर्षे काय केले हा प्रश्न निर्माण होत असल्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, नागपूरमध्ये मुंबईनंतर सर्वाधिक कोविड रुग्णांची संख्या होती, आम्ही कोविड नियंत्रणात आणला. कोविड संपल्यावर इतर विकास कामांना प्राधान्य दिले, लॉ युनिव्हर्सिटी, IIM, IIT सारखे इन्स्टिट्यूट आणले.
विकास कामांसाठी लढावं लागलं, झगडावं लागलं, कोणताही विभाग सोडला नाही सर्व विभागात कामे केली. विरोधक म्हणून कामे करायची नाही असे कधीच केले नाही. तसेच ११ हजार कोटींचे काम माझ्या विभागात केलं. साडेअकरा हजार मेगावॉट वीज निर्मिती चे लक्ष पूर्ण केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.