मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले मंत्री संजय राठोड यांच्यावर सध्या मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राठोड यांच्यावरील आरोपाचे स्पष्टीकरण दिले असून सदरचे आरोप हे अपरिपक्व असून संजय राठोड ज्या समाजातून येतात, त्या समाजी मागणी असल्याने त्यांना मंत्रीपद दिले असल्याचेही ते म्हणाले.
जालना : अबब...! 58 कोटी रुपयांची रोकड I 32 किलो सोन्यासह 390 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त
संजय राठोड ज्या समाजातून येतात, त्यांच्या आशा आकांशांचं प्रतिनिधीत्व ते करतात. अशा वेळेला त्यांच्या समाजाचीही मागणी होती, की त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसताना त्यांना मंत्रीपद दिलं जात नसेल तर त्यांच्या समाजावर अन्याय आहे. संजय राठोड मंत्री झाल्यानंतर या तपासात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच या प्रकरणात त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे दिसत नाही. त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले तर कारवाई करता आली असती. त्यामुळे हे आरोपच अपरिपक्व आहे, असेही ते म्हणाले.
🪀 WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन 'माणदेश एक्सप्रेस' Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा