नांदेड : बंडखोर,गद्दार आमदार आणि खासदारांना खूष करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणेघेणे नाही. शिंदे यांनी शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. पंरतु, शिंदे त्या ठिकाणी आले नाहीत. नांदेड, हिंगोली,परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज होती, मात्र शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, असे टीकास्त्र दानवेंनी सरकारवर सोडले आहे.
दरम्य्ना, नांदेडच्या पत्रकार परिषदेत दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना, खासदारांना खूष करण्याचं काम करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत काहीही घेणं देणं नाही, असं म्हणत दानवे यांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.