नागपूर : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा नुकताच पार पडला.यामध्ये एकाही अपक्ष आमदाराचा समावेश नव्हता. त्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, जेव्हा शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल. तेव्हा बच्चू कडू मंत्री राहिल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला दिलाय, असे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वक्तव्य केले आहे.
बच्चू कडू म्हणाले, 'जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा होईल तेव्हा बच्चू कडू मंत्री राहिल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला दिला आहे' तसेच ते पुढे म्हणाले कि, मला वाटतं मी मागे पण सांगितलं होतं की, मी व्यक्तीगत हितासाठी नाराज होणार नाही.आमचे काही महत्वाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावर आमची लढाई चालू राहिल, असेही बच्चू कडू यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी बच्चू कडू नागपूरच्या विधानभवनात दाखल झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.