मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे. मात्र, मराठा समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना भेटण्यास वेळ नाही. मुख्यमंत्र्यांनी आज संभाजीराजेंची भेट टाळली असल्याचा आरोप स्वराज्य संघटनेचे प्रवक्ता धनंजय जाधव यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले पण समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले' असल्याचंही जाधव यांनी सांगितलं.